Saturday, April 17, 2010

VIJAYDURG FORT

0 comments

FORT VIJAYDURGA
Gaced by the presence of his highness Chh.Shivaji Maharaj - Fort Vijaydurga has completed it's 800 glorious years. Located on the western coast of Maharashtra, this fort has witnessed inimitable bravery of Daryasarang Daulat Khan, C.V. Mesty & Maynak Bhandari. Fort Vijaydurga will always remain as a precious pearl of Maratha territory.
People living with this historical monument i.e. villagers of surrounding places decided to celebrate this historical event of the Fort in a grand manner. During 27 December 2005 to 2 January 2006, Vijaydurga Mahotsav was celebrated at fort Vijaydurga.
THE EASTERN GIBRALTER
Rule over Maharashtra would not be possible until Fort Gheria (as it was called then) is conquered. Well aware of this fact Britishers used all their tactics to conquer this Fort but could never succeed. The records & references confirm that though this Fort was attacked time to time, it remained unconquered and so finally Britishers named the Fort as “The Eastern Gibralter”.
Amongst the 16 Forts built in Maharashtra by Raja Bhoj, Vijaydurga is one of the most ancient and has witnessed the extra-ordinary bravery of Maratha soldiers. This Fort was built under the personal guidance & supervision of Mirza Valli Begh, Secretary to Raja Bhoj, as per the historical records.
CONQUEROR OF FORTS
Chh. Shivaji believed that the one who conquers the fort.. will conquer the kingdom. As per his belief; if Marathas had to rule the western coast of Maharashtra i.e. Konkan then they must have had this Fort under Maratha Infantry. With this ambition Chh. Shivaji included this fort under his reign without a major war in 1653 A. D.
FORT GHERIA RENAMED VIJAYDURG
The year in which this Fort was conquered in 1653 AD was Vijaysanvatsar (According to Hindu Mythology). Chh. Shivaji himself hoisted the flag on this Fort. Focusing this coincidence and in the memory of this great victory in the year of Vijaysanvatsar, Chh. Shivaji named this fort as Vijaydurga - meaning the fort of victory..
SECULAR IDOL
Chh. Shivaji and the frontiers of Maratha Army, Senapati Ibrahim Daulat khan and his two warrior colleagues Maynak Bhandari and CV. Mesti showed extra ordinary bravery to conquer this Fort. Chh. Shivaji handed over it to them with great trust and faith. This shows the secular attitude of Chh. Shivaji. As per the historical records Vijaydurga is the first coastal Fort conquered by Maratha army in 1653 A.D., later this Fort and Port both became an integral part for Maratha fleet and trade.
1653 TO 1756 MARATHA RULE
For very long period of 1653 and 1756 Vijaydurg was one of the prime asset of Maratha Forces. This Fort is blessed by the glorious bravery of late Serkhel Kanhoji Angre and late Anandrao Dhulap. When the tenure of Peshwa came to an end in 1818 the Fort was merged in British Empire. Later the Peshwas had to pay high prices for this
Besides hill and land forts some very prominent sea forts were built in the Maratha period. Vijaydurga or Victory Fort is one of the great forts of the Konkan. Vijaydurg Fort was strengthened around the 17th century by Shivaji, to whom it owes its finest features - the triple line of walls, the numerous towers and the massive interior buildings.

The Fort

Vijaydurg Fort in MahrashtraThe earlier name of this fort was Girye or Gheriya because it is surrounded by sea from three sides. The fort has an area of six hectares; there are twenty-seven Buruj inside the fort. Some of them have three floors. "Kothi Pirachi Sadar", "Kitta Sadar", Jails, 'Jakhinis' Canon, huge stones used for construction purpose, the platform built in the deep sea for guarding, etc all these things must be seen and are still puzzling to a viewer.

The underwater explorations on the western side of the fort, about 100m seaward revealed a stone structure at a water depth of 8 to 10m. It measures 122m in length, 7m in width and 3m in height. Besides it a tidal dockyard was also located around 3-km from Vijaydurg fort on the left bank of Vaghotan River.

The dockyard is 110m long and width is 75m. It was hollowed out of a rock. The southern and eastern side is cut out of a natural rock and rest is dry masonry. In addition to this a number of grapnel and triangular stone anchors were noticed in the adjoining area of dockyard.

History Of The Fort

It existed as a dilapidated fortification of the Shilahar period before it was taken over by the Bijapur kings, and then by Shivaji who made it a major naval base. When Shivaji failed to capture Murud-Janjira, he decided to create a similar stronghold and built Vijaydurg Fort, on a rocky projection south of Ratnagiri.

He had a triple line of walls built, as well as numerous towers. In 1698 AD, the Maratha naval commander Angre, who was the terror of all traders, made it his capital. This fort has a hollowed-out entrance to take vessels of 500 tons.

HOW TO GET THERE

Rail: Rajapur and Kudal are the nearest railway stations on Konkan railway. 

0 comments
The oldest fort on Sindhudurg coast constructed in the regime of Raja Bhoj of shilahar dynasty in 1205 (construction period 1193-1205). The fort was earlier known as "Gheria" as it is situated in the village "Girye". Shivaji Maharaj won this fort from Adilshaha of Bijapur in 1653 and renamed it as “Vijay Durg” as the then Hindu solar ear’s name was “Vijay”. Vijay means Victory.
The earlier fort encompassed area of 5 acres and was surrounded by sea on all the 4 sides. Over the years the eastern trench was reclaimed and the road was constructed theron. Presently the area of fort is about 17 acres and is surrounded by Arabian sea on its three sides. (1 acre 4840 sq yards). Chatrapati Shivaji extended  the area of fort by constructing three fort walls on the eastern side. These three fortifications are of 36 m height and he also constructed 20 bastions of the fortwall.

Vijaydurg Fort
Vijaydurg Fort
This is only one of the two forts of the Maratha kingdom, where King Shivaji personally hoisted the saffron flag.  The other fort is "Torana". This fort was also known as "Eastern Gibraltar" as this fort was impregnable for a long time like the fort “Gibraltar” in Europe. This impregnable fort has some locational advantages.  One such advantage is 40 km long waghotan/kharepatan Creek.  The big ships can’t enter the shallow water of this creek and hence Maratha warships were anchored in this creek. These ships were invisible from deep sea.
Vijaydurg Fort
Vijaydurg Fort
The Architectural marvel
1 The 200m long, undersea/underland tunnel from the fort to the Dhulap’s palatial house in the village is man-made. The roof of the tunnel has been pinched to protect it from land-slides and it is also well ventilated.  Now the tunnel is partially blocked. Using latest technology if this tunnel is cleared it will be a major tourist attraction and will be of great help for architectural students/history lovers.
2 The fencing compound wall constructed at 8-10 m depth undersea, 300ft from the fort is another architectural wonder. The wall constructed with laterite stones is 122 mtr long, 3 mtr high & 7 mtr in breadth. Majority of  attacking  ships met their watery grave after colliding on this wall as this wall is not visible above the sea level.

Discovery of helium
On 18-08-1868, a solar eclipse day a French scientist Johnson took the spectrometer readings from this fort.  The stone benches he used for taking the readings are known as  “saheb’s kattas” in local language. These spectrometer readings helped in detecting the presence of  “Helium”, one of the basic elements on Sun.

The naval dock:
1.5  km from the fort in the Wagjotan Creek, a naval dock was constructed by carving the rocks.  This is where the maratha warships were built and repaired.  The ships built here were of the 400-500 tonnage capacity.  This 109*70 mt dock faces the north side and is one of the major landmarks of maratha naval artchitecture.
Discuss: Vijaydurg Fort Experiences.
Accomodation:
As of now, Vijaydurg does not haveany budget/top end hotel. Dormitory accommodation with basic amenitiesis available. There are private home owners who offer there home asguest house for tourists.
Getting there:
Vijaydurg is 52 kms from Kasarde off Mumbai –Goa NH 17. 
It is 180 km from Panaji and 525 kms from Mumbai.
The nearest rail-herd is Kankavli on Konakan Rly Route (80 kms.)
Places to see nearby:
The palatial house of Dhulap in ‘Vijaydurg’ village has some beautifulwall paintings of natural colours. These paintings are of Maratha style.

TheRameshwar Temple at Girye is 3 Km from the fort. This stone archway andpathway leading to the temple is a sight and behold. This temple alsohas beautiful wall paintings and wooden engravings on the columns.

Wind mills, Devgad Fort (30 kms) and Kunkeswar Temple ( 40 kms.)
0 comments

अथांग अरबी समुद्र आणि हिरवगार निसर्ग यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे किल्ले आणि जलदुर्ग हे सिंधुदुर्गचे खास वैशिष्ट्य आहे.

vijaydurga
MH GOVT
विजयदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग वाघोटन खाडीच्या दक्षिणेस एका विस्तीर्ण खडकावर उभा आहे. शिलाहार राजघराण्याच्या कारकिर्दीत म्हणजे सन 1993 ते 1206 या काळात राजा भोज याने हा किल्ला बांधला. कोल्हापूरच्या पन्हाळा येथे शिलाहार घराण्यातील भोज राजा राज्य करीत होता. भोज राजाने एकंदर 16 किल्ले बांधले व काहींची डागडुजी केली त्यात विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे. सन 1200 मध्ये तो बांधला गेला असावा असा अंदाज आहे.

इ.स. 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकेपर्यंत या किल्ल्याने अनेक स्थित्यंतरे पाहिली. शिलाहारांचे राज्य देवगिरीच्या यादवांनी इ.स. 1218 मध्ये बुडविले. इ.स. 1354 मध्ये विजयनगरच्या राजाने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला व कोकण प्रांत बळकावला. पुढे इ.स. 1431 मध्ये बहमनी सुलतान अलउद्दीन अहमदशहा याने विजयनगर राजाचा पराभव केला. 1490 ते 1526 या काळात बहामनी राज्याचे 5 तुकडे झाले. त्यात विजापूरचा आदीलशहाकडे कोकणप्रांत सोपविला गेला. त्यानंतर 1653 पर्यंत सुमारे 129 वर्षे विजयदुर्ग विजापूरकरांच्या अंमलाखाली राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 साली हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला. 


छत्रपती शिवाजी महरांजानी हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा साधारण 5 एकर क्षेत्रात हा किल्ला विखुरलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आरमारी केंद्र स्थापन करावयाचे असल्याने त्यांनी किल्ल्याची दुरुस्ती व व्याप्ती केली. 14 एकर 5 गुंठे इतक्या क्षेत्रापर्यंत या किल्ल्याची व्याप्ती वाढविली. पूर्वेच्या बाजूला नवीन तटबंदी उभारली. 


किल्ला कसा पहाल 
vijaydurga
MH GOVT
किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मारुती मंदिर आहे. पडकोट खुष्क म्हणजे किल्ल्याची मुख्य तटबंदी सोडून कांही अंतरावर बांधलेली तटबंदी. मुख्य दरवाजाला संरक्षण देणार्‍या निबीच्या दरवाजापुढे गेल्यावर 30 मिटर उंचीची तटबंदी. मुख्य दरवाजाच्या आत एक लहान दरवाजा होता, त्यास दिंडी दरवाजा म्हणत. रात्रौ मुख्य दरवाजा न उघडता त्याचा जाण्या-येण्यासाठी उपयोग करीत. डाव्या बाजूला खलबतखाना नावाची इमारत आहे. या इमारतीमध्ये सभा बैठका होत. या इमारतीचच्या समोर दारु-गोळ्याचे कोठार आहे. 

पुढे गेल्यावर भुयार दिसते. भुयाराच्या बाजूने तटावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या किल्ल्यास विविध नावाचे 18 बुरूज आहेत. तटावरुन चालतांना बारकाईने पाहिल्यास तटाखालील कोठारे दिसून येतात. कांही अंतर चालून गेल्यावर लाईट हाऊस दिसते. लाईट हाऊसच्या पुढे तटाच्याखाली चुन्याचा घाणा दिसतो. तटाते बांधकाम करतांना दगडामध्ये सांधण्यासाठी वापरावयाचे सिमेंट मिश्रण म्हणून चुना, रेती, गुळ, हरड्याचे पाणी व नारळाचा काथा या घाण्यामध्ये मिश्रण करुन सिमेंट बनवत. चुन्याचा घाण्याच्या बाजूला गोड्या पाण्याच्या विहिरी, साहेबाचे ओटे, भवानी मातेचे मंदिर, जुने रेस्ट हाऊस, जखीणीची तोफ यासारख्या गोष्टी येथे पहावयास मिळतात.



Wednesday, April 7, 2010

किल्ले विजयदुर्ग – एक दर्शन

0 comments
   ज्याचे गड त्याचे राज्य हे छ्त्रपतींचे स्फ़ुल्लींग. या जाणत्या राजाने गिरीदुर्गाइतकेच महत्व जलदुर्गांना दिले. या युगकर्त्याच्या दुरद्रुष्टीतच मराठा आरमाराचा पाया घातला. याची सुरवात “विजयदुर्ग” स्वराज्यात सामील करुनच त्यांनी केली. म्हणुनच विजयदुर्ग हा मराठा आरमाराचा पाया होय. शिवाजीराजाच्या या वास्तवात उतरलेल्या स्वप्नांची ओळख आपण करुन घेणार आहोत.
                               किल्ले हे संरक्षणाचे मर्म असते आणि म्हणुनच त्या भुगोलाला महत्व असते आणि मग इतिहास घडत जातो. मित्रहो विजयदुर्ग हा पश्चिम किनारपट्टीच्या संरक्षणातला महत्वाचा दुवा. कुठे आहे तो ?
                               आजच्या सिंधुदुर्ग जिल्हातल्या देवगड तालुक्यात सर्वात उतरेकडील टोकाला मोक्याच्या ठिकाणी तो गेली सुमारे आठशे वर्षे उभा आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या लाटा झेलत हा भक्कम जंजिरा एका प्रदीर्घ इतिहासाचा वारसा जपतोय.
                               उतरेकडे राजापुर तालुका आणि दक्षिणेकडे देवगड तालुका यांना विभागणारी सुमारे ४० ते ५० कि,मि. लांबीची “वाघोटण खाडी”आहे. तिच्या उतरेला आजचा रत्नागिरि जिल्हा दक्षीणेला सिंधुदुर्ग जिल्हा या खाडीच्या मुखाशी हा बुलंद गिरिदुर्ग उभा आहे.
                               कोणी बांधला ? त्याचि स्थित्यंतरे कोणती आपण थोडे इतिहासात डोकावु त्या खेरीज त्याचे महत्व लक्षात यावयाचे नाही.
                               कोल्हापुरचा शिलाहार राजाभोज याने इ.स. १९९३ ते इ.स. १२०६ या दरम्यान हा किल्ला बांधला असा इतिहास तज्ज्ञांचा कयास आहे. राजा भोजाने कोकण प्रांतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर हा किल्ला बांधला. भोज राजाने एकंदरीत सोळा किल्ले बांधले तेसच काहींची डागडुजी केलि. तेंव्हाच हा बाधंला . इ.स. १२१८ मध्ये देवगिरिच्या यादवांनी शिलाहाराचे राज्य पादाक्रांत केले. तेंव्हापासुन सन १३५४ पर्यंत तो यादवांकडे होता. यादवांचा विजयनगरच्या साम्राज्याकडुन पराभव झाल्यानंतर हा किल्ला सन १४३१ पर्यंत विजयनगर साम्राज्यात होता. सन १४३१ मध्ये बहामनी सुलतानशाहीने विजयनगरचा पाडाव केला. नंतर या किल्ल्यावर इ.स.१४८९ पर्यंत बहामनी अंमल होता.( बहामनी सुलतान अल्लाउद्दीन अहमदशहा याने विजयनगच्या राजाचा पराभव केला. ) इ.स.१४८९ ते इ.स. १५२६ च्या दरम्यान बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर कोकण प्रांतासह या किल्ल्याचा ताबा विजापुरचा आदीलशाहाकडे गेला. इ.स. १५२३ ते इ.स. १६२३ अशी सलग १२७ वर्षे तो आदिलषाही अंमलाखाली होता. त्याच्याकडुन छ्त्रपती शिवाजीमहाराजांनी तो जींकुन घेतला. नंतर सलग एकशे तीन वर्षे म्हणजे १४ फ़ेब्रु १७५६ पर्यंत तो मराठी सत्तेचा मानबींदु होता. १७५६ साली इंग्रज + पेशवे विरुध्द तुळाजी आंग्रे अशा वादग्रस्त आणि दुर्देवी लढाईत अल्पकाळ येथे युनियन जॅक फ़डकला. नंतर पुन्हा पेशव्यांचा अंमल १२ ऑक्टोबंर १७५६ रोजी सुरु होऊन. जरीपट्का फ़ड्कु लागला तो थेट इ.स. १८१८ पर्यंत जेंव्हा पेशवाई बुडाली आणि सारा भारतच इंग्रजी अंमलाखाली आला होता. मित्रहो, हि झाली राजवटींची स्थित्यंतरे या प्रत्येकाला विस्त्रुत इतिहासाचे संदर्भ आहेत. प्रस्तुत लेखाचा तो विषय नाही. फ़क्त भॊगोलिक परिसराशी संबंधित इतिहास आणि शिवाजी महाराजांचा विजय यांच्याशी संबधित माफ़क इतिहास किल्ला अधिक चांगला समजण्याच्या द्रुष्टीने महत्वाचा आहे.
                               शिवकालापुर्वी या किल्ल्याचे नांव “घेरिया दुर्ग” असे होते का? सध्याच्या विजयदुर्ग किल्ल्यापासुन सुमारे ५ कि.मि. वर “गिर्ये” नावाचे गाव आहे. याच्या शेजारील दुर्ग म्हणून गिरिया – गिर्ये – घेरिया असे अपभ्रंशित नांव पडले. सन १६५३ साली महाराजांनी हा किल्ला अदिलशाहीकडून जिंकून घेतला तेंव्हा सुरु होते “विजय संवत्सर” अशावेळी भगवा फडकला म्हणून छत्रपतींनी नांव ठेवले “विजयदुर्ग” येथेच पूर्ण डागडुजी करून महाराजांनी सन १६५३ मध्ये मराठा आरमाराची मुहुर्तमेढ रोवली. त्यांचा स्वराज्यनिष्ठ साथीदार इब्राहीम दौलतखान मराठी आरमाराचा प्रमुख होता त्याचे कर्तबगार साथीदार होते मायनाक भंडारी आणि सिव्ही मेस्ती आजचे दुर्गाचे स्वरुप हे छत्रपतींच्या कल्पकतेतून साकारले आहे. या आवश्यक ऎतिहासिक माहितीच्या पार्श्वभुमीवर चला तर आपण किल्ला पहावयास जाऊ.
                               विजयदुर्ग खाडी आपल्या उजव्या हातास आणि गाव डाव्या हातास आहे. आपण आता जिथे आहोत ती अलिकडे भर टाकुन केलेली जमीन आहे. वास्तवात खंदक आहे. यावर पुर्वी लाकडी पुल होता. या खंद्कातुन समुद्राचे पाणी फ़िरविले होते म्हणुनच हि पुर्वेकडिल बाजु उर्वरीत तिन्ही बाजुंप्रमाणे समुद्रानेच वेढलेली होती . म्हणूनच हा जलदुर्ग – जंजिरा या संज्ञेत मोडतो.
                               उजव्या बाजुस ब-या स्थितीत आणि डाव्या बाजुस बरासचा भग्न उजवीकडे थेट समुद्राशी भिडलेला रुंद तट या सर्वात बाहेरील तटबंदीचा “पड्कोट खुष्क”म्हणतात . या तटाच्या आत काही पाय-या चढुन जाऊ थोड्याशा सपाटीवर डावीकडे श्री हनुमानाचे मंदिर आहे. शिवशाहीच्या परंपरेप्रमाने हे शक्तीचे प्रतीक किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी असुन याची प्रतिष्ठापना स्वहस्ते शिवरायांनी केली आहे. मंदीर डाव्या हाताला ठेवुन काही पाय-या चढुन आपण वर जाऊ, एक छोटेखानी पण बळकट द्वार लागेल हा आहे “जिभीचा दरवाजा” म्हणजे आघाडीचे दार हा ओलांडुन आत गेल्यावर डाव्याबाजुस सुमारे तीस मीटर उंचीची बळकट बुरुजांनी युक्त तटबंदी तर उजव्याबाजुस कमी उंच अंतर्गत तट्बंदी त्यापलीकडे खाली “पड्कोट खुष्क”त्याच्यापडीकडे खाडी दिसते. आता आपण दगडांनी बंदीस्त केलेल्या एका छोट्या रस्त्यावरुन पाय-यांच्या दिशेने चाललो आहोत. पाय-या चढताना त्या डावीकडे वळतात . दोन भक्कम आणि उंच बुरुजांपासुन आपण थेट भक्कम महाद्वारासमोर उभे आहोत. हे किल्ल्याचे एकमेव आणि मुख्य प्रवेशद्वार होय. दोन बुरुजांनी सुरक्षित केलेले गोलाकार वळसा घालुन प्रवेश करावे लागणारे हे प्रवेशद्वार आहे. यास गोमुख बांधणी म्हणतात. आत प्रवेश केल्यावर डाव्या व उजव्या बाजुस संरक्षकांच्या देवड्या लागतात. डावीकडील देवडीत एक तोफ़ – तोफ़गोळा – ऎतिहासिक माहिती व किल्ल्याचा नकाशा असलेला फ़लक आहे. दरवाज्यावर पेशवेकालीन लाकडी बांधकाम पहावयास मिळते. दरवाजा ओलांडुन किल्ल्याच्या मुख्य प्रकारात आलो आहोत. तोफ़ गोळ्यांनी मर्यादीत केलेल्या छोट्या रस्त्यासमोर बैठी इमारत दिसते ती आहे सध्याची पोलीस चॊकी व पुरातत्व खात्याची कचेरी आपण आता डाव्या बाजुस जाऊ, कमानी सारखा दरवाजा असणारी एक बंदीस्त इमारत यास खलबतखाना म्हणतात. गुप्त बैठकांची म्हहत्वाच्या निर्णयाची ही जागा होय. तसेच पुढे काही पाय-या चढुन तटावरुन एक भग्न इमारतीच्या अवशेषात आपण उभे आहोत. समोर दिसतोय ध्वजस्तंभ आणि चॊथरा उजव्या बाजुला देवडीत आहे, शंकराचे स्थान , हेच ग्रामदैवत रामेश्वराचे मुळ्स्थान परधार्मियांचे आक्रमनामुळे रामेश्वर येथुन विस्थापित झाल. आज तो गिर्ये गावी पेशवेकालीन जीर्णोद्धारीत मंदीरात विराजमान आहे. ( ते रामेश्वर मंदीरही पहाण्यासारखे आहे. उल्लेख इतरत्र ) आपण उजवीकडील तट्बंदीवरुन जाऊ शकतो . पण आपल्याला किल्ल्याच्या मुख्य प्रकारात बरेच महत्वाचे पहायचे आहे. मग तटबंदी पाहु. पाय-या उतरुन चॊकी डाव्या हातास महाद्वार उजव्या हातास ठेवुन जाऊ. उंच भिंतीच्या दुमजली भव्य अशी सदर लागते. प्रवेशद्वारातुन आंत गेल्यावर पुन्हा डाव्या हातास दोन दरवाजे असलेली मुख्य सदर लागते. ही इमारत किंवा इतर सर्वच इमारतींमध्ये दगडी बांधकाम भक्कम लाकडी तुळ्यांचा वापर हे बांधकामाचे वैशिष्ट्य पहाव्यास मिळते. सदरेसमोर प्रशस्त उतरुन गेल्यावर उद्धवस्त वस्तीचे अवशेष आढळतात. येथे खासेवाडे, आंग्रे यांचा वाडा, इतर सेनाधिका-यांचे असावेत . इथे एक पुरातन वटव्रुक्ष आहे. या खालीच भवानी मातेची मुळमुर्ती कित्येक वर्षे दुर्लक्षित पडली होती. ( उल्लेख इतरत्र येणार आहे.) याच्या समोर तिहेरी तटबंदीतिल सर्वात आतील संरक्षक तट्बंदी सुरु होती . थोडया पाय-या चढुन आपण एका दारातुन तट्बंदीवर प्रवेश करु. आपण ऎका भग्न अनेकमजली इमारतीत उभे आहोत. बाहेरुन हा बुरुज वाटतो. यांच्या गवाक्षातुन समोरील खाडी दुरपर्यंत स्पष्ट दिसते. या वास्तुच्या डाव्या उजव्या बाजुला दारातुन बाहेर पडु. तटाला असणा-या पाय-या उतरुन खाली येऊ. समोर दुस-या तटबंदीला भिडलेले दारुचे कोठार दिसते. ही भक्कम दगडी चुनेगच्चीयुक्त इमारत आंग्रे विरुध्द इंग्रज + पेशवे यांच्या इ.स. १७५६ युध्दात निर्णायक ठरली अकल्पितपणे आतील दारुसाठ्याने पेट घेतला आणी आतील मारगिरी हतबल झाली. वन्ही तांडव इतके तीव्र होते. आपण मघाशी ज्या भग्न इमारतीतुन उतरलो ती आणि आजुबाजुची प्रचंड दगडी तटबंदी तप्त लोहाप्रमाणे लाल झाली होती. दारु कोठाराच्या डाव्याबाजुस तटाखालुन एक उत्तम भुयार जाते. या वैशिष्ट्यपूर्ण भुयारात आपण प्रवेश करु. दोन्ही बाजुला असंख्य पुरातन तोफ़गोळे पडलेले आहे. भुयार संपुन काही पाय-या चढुन आपण सर्वभुत “खुबलढा-तोफ़ाबारा”या थेट समुद्राला भिडलेल्या ३६ मी.उंचीच्या लढाऊ बुरुजावरुन येतो. किल्ल्यावरील आक्रमनाची ही प्रमुख जागा आहे. तोफ़ांच्या मारगिरीची मोठी छिद्रे . टेहळणी चॊथरे, पाण्याची डोणी यांनी युक्त हा वैशिष्ट्यपुर्ण बुरुज आहे. आपण आता पुन्हा खाली उतरुन भुयारातुन परत किल्ल्याच्या मुख्य प्रकारात येऊ. सदर ओलांडुन राज रस्त्याने सदर उजव्या हातास ठेवुन साधारण पश्चिमेकडे जाण्यास लागु. सदरेला लागुन उत्क्रुष्ट अशी घोड्याची पागा आहे. तर डाव्या बाजुला विहीर आणि एक तुळशी व्रुदांवन झाडीत दिसते. थोडे पुढे गेल्यावर उजव्या हातास सदरेपलीकडे एक भग्न वास्तु आहे. यास “पिराची सदर”म्हणतात . पुन्हा राजरस्त्यावर येऊन चालावयास लागु. डाव्या बाजुस उंच, भक्कम अंतर्गत तटबंदीचा भाग दिसतो. आपण या वैशिष्ट्यपूर्ण तटबंदीच्या जवळ जाऊ हा सर्वात आतील गोलाकार संरक्षक तटबंदीचाच भाग आहे. पण आपण जिथे उभे आहोत तिथे खाली थेट जमिनीत उतरलेल्या दगडी पाय-या आहेत. या पाय-या आपल्याला दीर्घ आणि अचंबित करणा-या एका भव्य भुयाराला तोंडाशी घेउन जातात. हे भुयार येथेन सुरु होते आणि तेथुन एक, दीड कि.मी. वर असणा-या सरदार धुळपांच्या वाड्यात उघडते!! त्याचा मार्ग दोन्ही बाजु बंद असल्यामुळे अज्ञात आहे. पण समुद्राच्या तो इतका जवळ आहे. निदान भरतीवेळी तरी समुद्राखालचा बोगदा म्हणता येईल. आपण आता पुन्हा रस्त्याने साधारण वायव्येकडे जावयास लागु. आपल्या उजव्या हाताला झाडीत लपलेली एक छोटी टेकडी दिसते हीच ती प्रसिद्ध निशान टेकडी. मित्रहो याच टेकडीवर किल्ला जिंकल्यावर स्वहस्ते प्रत्यक्ष छ्त्रपतीनी स्वराज्याचे भगवे निशाण लावले. जणु विजय संवत्सरात विजयदुर्ग विजय पताका फ़डकली. मुळ किल्ला या टेकडीच्या आसपासच्या सुमारे पाच एकरांवर वसला होता. आता तो पसरला आहे. शिवस्पर्शाने पुनीत झालेल्या मातीस वंदन करुन आपण पुढे सरकु. समोरच भग्न मंदीराचे अवशेस दिसतात. ५७ फ़ुट लांब आणि ४० फ़ुट रुंद असे हे “भव्य भवानीमाता मंदीर”आहे. सदरे समोरील प्राचीन वटव्रुक्षाखाली दुर्लक्षीत पडलेली भवानी माता, हे तिचे मूळस्थान (हल्लीच सरपंचाना झालेला द्रुष्टान्त? गावक-यानां भावना, पुरातत्व खात्याचे लेले, अभ्यासक श्री.राजेंद्र परुळेकर यांच्या प्रयत्नातुन श्री मूर्तीची विधिवत मूळजागी प्राणप्रतिष्ठा केली आहे) मंदीर ओलांडुन पुढे जाऊ. उत्तम सिमेंटने गुळगुळीत केलेले दगडी ओटे दिसतील . यालाच “साहेबाचे ओटे”म्हणतात. मित्राने आपण उभे आहोत त्या जागेचे आणि ओट्याचे जागतीक महत्व आहे. कारण याच जागेवरुन “हेलियम”या मूलद्रव्याचा शोध लागला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याचे असे झाले सन १८९८ साली एक खग्रास सुर्यग्रहण झाले. संपुर्ण जगात सुर्य आणि प्रुथ्वी यातील सर्वाधीत कमी अंतर असणारी ही जागा होती. त्यामुळे सुर्यग्रहणाचे निरीक्षण करण्यासाठी त्याचा आगाऊ अंदाज वर्तवणारा अमेरीकन शास्त्रज्ञ “जॅनसन व लॅकिअर”यांनी इथे दुर्बिणी लावल्या होत्या तेंव्हा निरीक्षणे करतांना त्यांना सुर्याभोवती पिवळे वलय आढळले. तेंव्हा त्याचा अर्थ बोध झाला नाही. पण नंतर अधिक संशोधन करतांना, स्पेक्ट्रोग्राफ़ घेतल्यावर लक्षात आले तो एक वायु आहे. त्याला म्हटले “हेलियम”म्हणजे हेलिऑस याचा अर्थ सुर्य. सुर्यावर असणारे अथवा आढळणारे म्हणुन “हेलियम”हे एक वायुरुप मुलद्रव्य असुन त्याच्या शोधाचे जनकत्व लॅकिअर आणि फ़्रॅंकलंड यांचेकडे जाते. हेलीअम हे नाव त्यानीच सुचविले म्हणुनच विजयदुर्गास हेलिअम गॅसचे “पाळणाघर”म्हणतात. आपण आता आपल्या डाव्याबाजूला दिसणा-या अप्रतिम बांधणीच्या चॊकोनी जलाशयाकडे जाऊ. तळापासुन वरपर्यंत बांधुन काढलेला हा तलाव किल्ल्यातील गेल्या पाण्याचा मुख्य साठा होय असे म्हणतात. याच्या तळाशी शिशाचा थर होता असे सांगतात. तळापर्यंत पाय-या असणारा जलाशय आज मात्र पूर्ण कोरडा आहे. त्याच्या अलीकडेच एक छोटेखानी जलाशय आहे. आपल्यासमोर जी भक्कम वास्तु उभी आहे. ती आहे “धान्याचे कोठार”आत उतरुन जाऊ स्वच्छ मोकळी हवा, भक्कम चुनेगच्ची बांधकाम. धान्य साठविण्यास योग्य वातावरण आपल्या लक्षात येईल. कोठारामधुन बाहेर आल्यावर किंचितपुढे डाव्या हातास एक खोलीवजा बांधकामासमोर मध्यम आकाराची तोफ़ पडली आहे. त्यास म्हणतात. “जखिणीची तोफ़”हेच नांव का? काहीही संदर्भ नाही.
                               हे झाले किल्ल्याचे अंतरंग आता आपणास पहावयाचे आहे. समुद्राला भिडलेला भक्कम तट आणि त्यावरील वैशिष्ट्यपुर्ण बांधकामे. सुरुवात आपण ध्वजस्तभांपासुन करु ( ज्याचे वर्णन पूर्वी केलेले आहे.) नंतर लागते पोलीस कचेरी / पुरातत्व कचेरी मागील ढासळत चाललेली तटबंदी नंतर लागते तटावरील तीनमजली पडकी वास्तु. त्याच्या शेजारी आहे नरबुरुज याचा अर्थ पुर्णपणे भक्कम आणि भरीव बुरुज. नरबुरजावरुन बरेच पुढे गेले की प्रशस्त मोकळ्या जागेत समुद्राला भिडुन तटावर असणारी एक वास्तु आपले लक्ष वेधुन घेते. यास “माडी”असे म्हणतात. हा असावा राणीवसा सर्व सुखसोयी तसेच संडास / बाथरुम उत्तम गवाक्ष, गोलाकार बसविलेले सज्जा यांनीयुक्त ही वास्तु आहे. पुन्हा इथेही दगडात लाकडी खांब / तुळ्यांचा वापर आपणास पहावयास मिळतो. या वास्तुच्या गवाक्षातुन समुद्रकिनारा, पश्चिम क्षितीज याचे अप्रतिम दर्शन होते. ही किना-याकडिल बाजु असल्यामुळे तटबंदी अधिक उंच आहे. येथुन पुढे सुरु होतो. थेट समुद्राला भिडलेला बुलंद तट. एखादे मोठे वाहन जाऊ शकेल अशी आतील भक्कम भिंत मारगिरीसाठी विशिष्ट लहान-मोठ्या, एकेरी-दुहेरी-तिहेरी जागा यांचे आकार आणि कोन वेगवेगळे पहावयास मिळतील. जितका कोण तीव्र व खाली तितका पल्ला कमी, सरळ व मोठा तितका पल्ला लांब. यास “जंगी”असे म्हणतात. प्रत्येक बुरुजावरील पाण्याची डोणी ठिकठिकाणी शॊचकुपे, स्नानग्रुहे आदी या तट्बंदीची वैशिष्ट्ये. बुरुजाची नावे पाहुया! १) गणेश बुरुज २) राम बुरुज ३) हनुमंत बुरुज ४) दर्या बुरुज ५) तुटका बुरुज ६) शिखरा बुरुज ७) शिंदे बुरुज ८) शहा बुरुज ९) व्यंकट बुरुज १०) सर्जा बुरुज ११) शिवाजी बुरुज १२) गगन बुरुज १३) मनरंजन बुरुज १४) गोविंद बुरुज १५) सदाशिव बुरुज १६) खुबलढा बुरुज १७) घनची बुरुज १८) पाण बुरुज १९) पड्कोट बुरुज २०) नरबुरुज
                               हे बुरुज पहात तटबंदीवरुन फ़ुरताना बारकाईने पहा. तटाखाली कोठारे आहेत. बाहेर मुद्दाम म्हणुन टाकलेला मोठमोठया धोंडी आहेत. हेतु हा सतत येणा-या समुद्राच्या लाटा या धोंडीवर आपटुन फ़ुटाव्यात. पर्यायाने लाटांचा तट आणि बुरुज यावरील मारा सिमीत व्हावा आणि किमान हानी पोहोचावी.
                               आणि एक वैशिष्टपुर्ण गोष्ट अशी. अंतर्गत आणि बाह्य तटबंदीच्या मध्ये तलाव व धान्य कोठार यांच्या मागील बाजुस एक अप्रतिम गोड्या पाण्याची विहीर आहे. गेली अंदाजे ८०० वर्षे हा किल्ल्यातील गोड्यापाण्याचा स्त्रोत अव्याहत आहे. मित्रहो या विहिरीपासुन फ़क्त तट्बंदी ओलांडली की सर्व बाजूंनी खा-या पाण्याचा विशाल सागर आहे............ याच्याजवळ किल्ल्यातील बांधकामासाठी लागणारी चुन्याचे घाणी आहे. ८०० वर्षे टिकलेल्या बांधकामाचे चिरे याच घाणीतील चुन्याने साधले आहेत!........
                               मित्रहो इ.स.१६५३ साली युगकर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या दुर्गावर मराठा आरमाराची मुहूर्तमेढ रोवली त्या ऎश्वर्य संपन्न इतिहासाचा प्रकार पाहुन आपण आता प्रवेशद्वाराशी उभे आहोत. इथल्या प्रत्येक कणाला सुवर्णाचे मोल आहे. मनात आपोआप निश्चय होतो हा स्फ़ूर्तीदायक इतिहास जपला पाहिजे. पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणुनच आपोआप गर्जना बाहेर पडते.